शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

महाबळेश्वरमधील घरांना झड्या, प्लास्टिक आच्छादन-शेगडी, कपडे वाळविण्यासाठी कोळशाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:45 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होताच संरक्षणासाठी स्थानिकांकडून घरांना प्लास्टिक व झड्या लावण्याचे काम सुरू केले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

महाबळेश्वमध्ये दिवसाला ४८२ मिलिमीटर अर्थात १९ इंचांपर्यंत पाऊस पडतो. जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये तर महाबळेश्वरमध्ये सूर्याचं दर्शनच होत नाही. आता या नगरीचे स्वरूप हंगामी राहिले नसून बारमाही झाले आहे. येथे येणारे पर्यटक आता पावसाळ्यामध्ये देखील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.

येथील हॉटेल व्यावसायिक हंगाम संपताच जून महिन्यामध्ये पावसाळी नियोजनास सुरुवात करतात. ते प्रथम झड्या व प्लास्टिक, शेगडीसाठी, कपडे सुखविण्यासाठी लागणारा कोळसा आदींची खरेदी स्थानिक करतात. कारण तीन-चार महिने धुवाँधार कोसळणाऱ्या पावसापासून घरांचे, इमारतींचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने घराच्या छतावर प्लास्टिक कागद तसेच संपूर्ण इमारती प्लास्टिकने बंद करण्याची कामे वेगाने सुरू असतात.

आर्द्रता, थंडी व पावसाळी विषाणू येण्यापासून प्रतिबंध करणे हा एकमेव झड्या लावण्याचा उद्देश असतो. पूर्वीपासून गवत व कारवीच्या काड्यांनी झड्या लावल्या जात होत्या. आधुनिकतेकडे जाताना बाजारात गवताच्या झड्यांना आता विविध रंगी प्लास्टिक कागदाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विविध रंग व आकाराचे प्लास्टिक कागद बाजारात उपलब्ध आहेत. या कागदाने संपूर्ण इमारत सहजपणे आच्छादू जाऊ लागल्याने प्लास्टिक कागदांच्या वापरात वाढ झाली आहे.इमारतीच्या छतांसाठी प्लास्टिक कागदाचा वापर वाढला आहे. प्लास्टिक कागदासोबतच पारंपरिक झड्यांचा वापर आजही सुरूच आहे.पावसाळ्यात नौकाविहार बंद..महाबळेश्वर व पाचगणीची जीवनवाहिनी असलेल्या व पर्यटकांच्या पसंतीचे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक पावसाळ्यामध्ये काहीच दिवसांत दुथडी भरून वाहते. त्यामुळे नगरपालिका नौकाविहार बंद ठेवते तर हे पाणी महाबळेश्वर, पाचगणी या मुख्य रस्त्यावर आल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्पदेखील होते.